यवतमाळ शहरातील अविकसित वस्तीत जन्माला आलेल्या “डॉ.निरज वाघमारे ” यांनी आपल्या उमेदीच्या काळात सामाजिक कार्यास व राजकीय क्षेत्रात अमिट ठसा उमटवून प्रत्येकांना अवाक केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवख्या असलेल्या पक्षात २००८ साली सहभागी होऊन सामाजिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात कार्य डॉ. निरज वाघमारे यांनी आपले भविष्य आजमावण्याचा निर्धार केला मनसेच्या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास १०० बोगस पॅथॉलॉजी लॅब च्या विरोधात वाघमारे यांनी बोगस लॅब बंद करण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासनाने या प्रकाराकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने अखेर वाघमारे यांनी यवतमाळ शहरातील पाच बोगस पॅथॉलॉजी लॅब वर मोर्चा वळून या लॅब ची तोडफोड केली. या आरोग्य क्षेत्रातील पहिल्या वहिला आंदोलनाने डॉ.निरज वाघमारे यांना शहरासह जिल्हाभरात एक नवी ओळख निर्माण करून दिली. पुढे वाघमारे यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आलेख उंचावत गेला. यवतमाळ शहरातील आवाज उठून मनसे रोजगार स्वयंरोजगार संघटना यांच्या माध्यमातून जिल्हयातील अनेक युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून दिले. सण २०१२ काळात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून तत्कालीन आयकर विभागाचे आयुक्त भरत आंधळे यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जिल्ह्यातील एकत्रित मार्गदर्शन घडवून आणण्याचे काम डॉ. निरज वाघमारे यांनी केलं. यवतमाळ शहरातील विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या भागांमध्ये डॉ. निरज वाघमारे यांनी या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने स्वतःच्या खर्चाने घनकचरा संकलनासाठी घंटा गाडी, मनुष्यबळ, ट्रॅक्टर व याचं बरोबर या भागातील नाले सफाई करण्याचे दरमहा काम डॉ. निरज वाघमारे करीत असतात. या उपक्रमाची सुरुवात दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी सुरुवात करण्यात आली. आज हा उपक्रम निरंतरपणे चालु आहे. या उपक्रमाने डॉ. निरज वाघमारे यांना आरोग्यदुत अशी नवी ओळख प्राप्त झाली. याच बरोबर स्थानिक प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमतेने ज्या भागांत नाल्या, गटारे, स्वच्छतागृहे आणि रस्त्याची दुरवस्था आहे. त्या घटकांसाठी डॉ. निरज वाघमारे यांनी स्वतः खर्च करून ह्या प्रश्नांना सोडविण्यासाठी कार्यरत असतात.



यवतमाळ शहरातील सार्वजनिक शौचालयाची असलेली दुरवस्था स्थानिक प्रशासनाच्या लक्षात यावी याकरीता १९ जानेवारी २०२१ रोजी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्यधिकारी सुनिल बल्लाळ यांना संडासच्या शिट वर निवेदन लिहून हा प्रश्न समोर आणला. या अभिनव आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकाऱ्यानी शहरांतील सर्व शौचालयाची स्वच्छता करून पाणी, वीज व सर्व समस्या दूर करुन ही स्वच्छतालये पुन्हा जनतेच्या वापरासाठी खुले केले. ह्या सर्व प्रकारचे सर्वस्वी श्रेय डॉ. निरज वाघमारे यांना देण्यात येते..
सण २०२० आणि २१ च्या दोन वर्षाच्या काळात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. या काळात डॉ. निरज वाघमारे यांनी स्वखर्चाने अन्नधान्य वाटप, मास्क वाटप, सॅनिटायझर व फॉगिंग यासारखे आरोग्य हिताची कामे डॉ. वाघमारे यांनी केली. त्यामुळं डॉ. वाघमारे यांना कोरोना योद्धा म्हणून शासन दरबारी सन्मान करण्यात आला.
शहरातील आथिर्क मागास असलेल्या वस्त्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलांना मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी पॅड खरेदी करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने या महिलांना दरमहा “जबाबदारी माता भगिनींच्या आरोग्याची” ह्या उपक्रमा अंतर्गत सॅनिटरी पॅड मोफत पुरविण्याचा अभिनव उपक्रम डॉ. निरज वाघमारे यांनी चालु केला. हा अभिनव उपक्रम राज्यातील पहिला अभिनव उपक्रम ठरल्याने डॉ. निरज वाघमारे यांना “पॅड मॅन” असेही जिल्हाभरात संबोधले जाते.
कोरोना काळात जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढला होता यामुळे मृतांचा आकडाही वाढत गेला होता. रुग्णांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्याकरिता शासनाकडे निधीची ही वानवा झाली होती त्या कारणाने मृतकांचे पार्थिव शरीर जाळण्यासाठी लाकडे/सर्पण उपलब्ध होत नव्हते याकरिता दिनांक २४ मार्च २०१९ रोजी डॉ.निरज वाघमारे यांनी तत्कालीन विभागीय आयुक्त यांच्याकडे पसरून मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्पण / लाकडे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून लाकडी गोवऱ्या पदार्थ उपलब्ध करून दिले होते..
याचं काळात प्रशासनाची आरोग्य यंत्र तोकडी पडत असताना डॉ. निरज वाघमारे यांनी स्वतःच्या खर्चाने रुग्णवाहिका व आरोग्य सेवकांची फौज उभी करून आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली हे कार्य आजही निरंतर चालू आहे. ही रुग्णवाहिका रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत सेवा देत असते.
यवतमाळ जिल्ह्याला मोठी खाद्य संस्कृती लाभलेली असल्याने वऱ्हाडातील चुलीवरची मटन, सळई, मटन – मांडे यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मटन विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र मटन दरात मनमानी वाढ झाल्याने या खाव्वयाची गैरसोय होत होती. त्यामुळे मटणाचे दर निश्तित करण्यासाठी दिनांक १४ जानेवारी २०२१ रोजी डॉ. निरज वाघमारे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एम. डी. देवेंद्रसिंह यांना निवेदन देऊन हे दर निश्चित करण्याची मागणी केली होती. ह्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील मटनाचे दर निश्चित करण्याचे आदेश संबधित विभागाला दिले होते. ह्या अभिनव मागणीची जिल्हाभरात जोरदार चर्चा झाली होती.
रस्त्याच्या कडेला लहान सहान उद्याग – व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना उन वारा पाऊस यापासून सरक्षण व्हावे यासाठी डॉ. निरज वाघमारे यांनी शहरातील शेकडो लघु व्यवसायिकांना छ्त्र्याचे वाटप केले.




यवतमाळ जिल्हायाला कायमस्वरूपी सरकारी कामगार अधिकारी नसल्याने कामगारांचे अनेक प्रश्न आणि समस्या प्रलंबित रहात होत्या याबाबत अनेक कामगारांनी आणि सामन्यांनी ह्या मुद्द्याला घेऊन डॉ. निरज वाघमारे यांच्याकडे तक्रार केल्या. त्यावर डॉ. निरज वाघमारे यांनी अमरावती विभागाचे उपयुक्त अ. ऊ. कुटे यांची २२ जानेवारी २०२१ रोजी भेट घेऊन जिल्ह्याला कायमस्वरूपी सरकारी कामगार अधिकारी द्यावा अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत येत्या ८ दिवसात जिल्हायाला चां. ब. काशीद यांची कायमस्वरूपी सरकारी कामगार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आपल्या आजूबाजूला, परीसरात, देश विदेशात घडत असलेल्या घटना घडामोडीची इत्म्भूत माहिती आपल्या पर्यंत पोहचविणाऱ्या प्रसार माध्यमातील वृतपत्र घरोघरी पोहचविणाऱ्या हॉकर्सना डॉ. निरज वाघमारे यांच्या तर्फे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला रेनकोट वाटप करण्यात येतात.
यवतमाळ शहरातील नेताजी नगर हा भाग स्वातंत्र्य प्राप्ती पूर्वी पासुन अस्तित्वात आहे. परंतु या भागाला स्थानिक प्रशासनाकडून मान्यता न देता एक अतिक्रमण भाग म्हणूनच ठेवले होते. त्यामुळे या भागातील रहिवाशांना हक्काचे घर पट्टे द्यावे अशी मागणी येथील लोकांनी वारंवार केली होती. परंतु शासना कडून याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात होते. यामुळे या मुद्द्याला तीव्र स्वरूपाचे करण्याचे काम डॉ. निरज वाघमारे यांनी केले. हा मुद्दा आणि यातील वेळोवेळी केलेले आंदोलन डॉ. निरज वाघमारे यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण मानल्या जातात. या लढ्यासाठी डॉ. निरज वाघमारे यांनी आपल्या आयुष्यातील दोन वर्षा पेक्षा अधिक काळ यासाठी वेचला वेळ प्रसंगी कधी सौम्य तरी कधि मवाळ भूमिका घेऊन हा मुद्दा मार्गी लावला. दिनांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी स्थानिक नगर परिषद, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे या मागणीला घेऊन निरज वाघमारे गेले. परंतु “शासकिय काम बारा महिने थांब” या प्रमाणे या प्रकरणाला बराच विलंब लागत असल्याने डॉ. निरज वाघमारे यांनी आपले राजकीय वजन आणि वाशिल्याच्या जोरावर हा मुद्दा सरकारी दप्तरी फास्ट ट्रॅक वर चालवला.
या विषयात सर्व प्रथम या जागेची भूमी अभिलेख विभागा मार्फत मोजनी करून देणे क्रमप्राप्त असते. परंतु या कार्यास संबधित विभागाकडून टाळण्यात येत होते. त्यामुळे डॉ. निरज वाघमारे यांनी सर्वप्रथम जानेवारी २०२१ मद्ये आंदोलनाचा इशारा दिला. या इशाऱ्या नंतर प्रशासन नरमाईस आले. आणि भूमी अभिलेख विभागा मार्फत मोजणीला सुरुवात झाली.
यवतमाळ शहरात दर वर्षी पाणी टंचाईच्या झळा शहराला सोसाव्या लागतात या काळात स्थानिक प्रशासन यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी असमर्थ असते त्यामुळे या काळात पाण्या वाचून कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ. निरज वाघमारे आपल्या स्वयं खर्चाने शहरातील विविध भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करतात गेल्या अनेक वर्ष हा उपक्रम चालले असून या माध्यमातून डॉ. निरज वाघमारे यांना यवतमाळ शहरात जलदूत असेही संबोधले जाते..
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी व खेळाडू वृत्ती वृद्धिंगत व्हावी याकरिता डॉक्टर नीरज वाघमारे यांच्यातर्फे शहरात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते यामध्ये क्रिकेट फुटबॉल टेनिस यांसह इतर मैदानी खेळ व इतर कळ्यांचे स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या माध्यमातून अनेक खेळाडूंना व क्रीडाप्रेमींना एक मेजवानी असते. नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत राज्यातील विविध संघांनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेचे आयोजन शहरातील नेहरू स्टेडियमवर करण्यात आले होते..
डॉ. नीरज वाघमारे यांचे यवतमाळ शहरासह जिल्हाभरात अनेक चाहते असून त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे गतवर्षी झालेल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व अन्य उपक्रमांचे आयोजन त्यांच्या चाहत्यांनी केले होते यामध्ये मुख्यतः साखर तुला करून या साखरेचे गोरगरीब जनतेत वाटप करण्यात आले होते.
यवतमाळ शहरातून अनेक मोठ मोठ्या शहरांना जोडणारे रस्ते जात असल्यामुळे या रस्त्यांवर नियमित मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशाच शहरातून जाणाऱ्या दारव्हा – अमरावती रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याने, यामध्ये पावसाचे पाणी साचून लहान – सहान अपघाताचे प्रमाण वाढले होते. याविषयी स्थानिक प्रशासन व बांधकाम विभाग यांना वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करून सुद्धा या रस्त्यांची डागडुजी संबंधित विभागांनी करत नसल्याने या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी डॉ. निरज वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मासे सोडून एका अभिनव आंदोलनाने प्रशासनाची गोची केली होती. या आंदोलनाची दखल घेत, दोन दिवसांनी या रस्त्यावरील सर्व खड्डे हा रस्ता व्यवस्थित करण्यात आला होता.





कोरोना संसर्गजन्य काळात बोगस पॅथॉलॉजी लॅबने पुन्हा डोके वर काढल्याने सामान्यांसह रुग्णांची मोठी फसवणूक जिल्हाभरात चालू होती. यासंबंधी आरोग्य प्रशासनाच्या मुख्य असलेल्या सर्व अधिकाऱ्यांशी डॉ. निरज वाघमारे यांनी पत्रव्यवहार केला मात्र सर्व विभागांनी हात झटकून आपण या विभागाशी संबंधित नसल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले होते त्यामुळे अखेर डॉ. निरज वाघमारे यांनी स्वतःच्या रक्ताने एक निवेदन लिहून आरोग्य उपसंचालक, अकोला यांना हे निवेदन देउन जिल्ह्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅब वर कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती…
मध्यंतरीच्या काळात यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा पूर्णता बोजवारा उडाल्याने ही यंत्रणा पूर्ववत व व्यवस्थित व्हावी याकरिता तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांची डॉ. निरज वाघमारे यांनी भेट घेऊन जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणे संदर्भात चर्चा केली.
डॉ.नीरज वाघमारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन नागपूर येथील विविध संस्थेच्या विद्यमाने मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नट विजय पाटकर यांच्या हस्ते डॉक्टर वाघमारे यांना लीडरशिप पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण नागपूर येथील ब्ल्यू रेडिसन हॉटेल येथे करण्यात आले..
परिक्षा क्षेत्रात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावं यासाठी दिनांक १८ जुन २०२२ रोजी डॉ. निरज वाघमारे यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रांत सुप्रसिद्ध असलेले प्रा. नितेश कराळे स्पर्धा आयोजित केलेल्या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे जिह्यातील हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती..
नेताजी नगर भागातील अतिक्रमण धारकांच्या जागेची चालु झालेली मोजणी अपरिहार्य कारणामुळे बंद झाली होती. ही मोजणी पुन्हा तात्काळ चालु व्हावी यासाठी डॉ. निरज वाघमारे यांनी यवतमाळ शहरातील तहसील चौकात दिनांक २४ मे २०२२ पासुन आमरण चालु केले होते. ह्या आमरण उपोषणाची धग सतत चार दिवस कायम असुन अखेर भूमी अभिलेख विभागाला नमते होत. डॉ. निरज वाघमारे यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. व दिनांक ३० जुन २०२० पासुन या जागेची मोजणी चालु करण्यात आली व पुढील १८ दिवसात या सर्व भागाची मोजणी पुर्ण झाली असुन आता या घरपट्टे वाटपाचा मार्ग मोकळा झाला. हे आमरण उपोषण डॉ. वाघमारे यांच्या सामजिक व राजकीय जीवनातील सर्वात मोठे आंदोलन आहे. ह्या आमरण उपोषणाला जिह्यातील अनेक राजकिय पक्ष व सामजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला होता. गेल्या ७० – ७५ वर्षापासून प्रलंबित असलेला जटिल प्रश्न डॉ. वाघमारे यांच्या मुळे सुटल्याने येथिल रहिवाशी डॉ. वाघमारे यांचे आभार मानतात…
सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्याबरोबर ही डॉ. निरज वाघमारे यांचे धार्मिक कार्यात सुद्धा मोलाचे योगदान आहे यामध्ये घरगुती गणपती सजावट स्पर्धा, तान्हा पोळा बैल सजावट स्पर्धा, रक्षाबंधन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती, रमजान ईद, बकरी ईद, यासारख्या धार्मिक कार्यात डॉ. निरज वाघमारे नेहमीं अग्रेसर असतात. नुकत्याच पार पडलेल्या २०२२ च्या बुध्द जयंतीच्या अनुषंगाने १७ मे २०२२ रोजी यवतमाळ शहरांतील नंदुरकर विद्यालयात महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांचा बुद्ध – भीम गीतांचा भव्य दिव्य कार्यक्रम डॉ. वाघमारे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास जवळपास १० हजार लोकांची उपस्थिती होती. याच बरोबर जिह्यातील ज्या माता भगिनींना भाऊ नाही त्या माता भगिनी डॉ.निरज वाघमारे यांना आपला भाऊ म्हणून त्यांना दरवर्षी राखी बांधत असतात यावर्षी जवळपास ७०० महिलांनी डॉ. निरज वाघमारे यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यवतमाळ शहरातील हे सर्वात मोठे रक्षाबंधन म्हणून चर्चेस आले होते.
मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणून ओळख असलेल्या रमजान महिन्याच्या औचीत्याने डॉ. निरज वाघमारे अन्नधान्य वाटप व ईतर सामजिक उपक्रम राबवित असतात.
डॉ. निरज वाघमारे यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन नेल्सन मंडेला पिस पुरस्कार तर्फे डॉ. निरज वाघमारे यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. ह्या पदवीचे प्रदान प्रल्हाद मोदी, सिने अभिनेत्री मंदिरा बेदी, गुजरात राज्याचे पोलिस महासंचालक अनिल प्रथम, सुप्रिद्ध गायक उदित नारायण यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. वाघमारे यांना मिळालेल्या डॉक्टरेट पुरस्काराने वाघमारे यांच्या सामजिक कार्याचा खरा गौरव झाल्याचे ही चाहत्या कडून बोलण्यात येते…


नेताजी नगर, दारव्हा रोड, यवतमाळ
मोबाईल – ९२७००७८००८,
ऑफिस – ७७५५८८४५६७
contact@drnirajwaghmare.in
सामाजिक संघटना
स्वाभिमान कामगार संघटना, महाराष्ट्र

स्वाभिमान कामगार संघटना, महाराष्ट्र ही संघटना कामगारांच्या न्याय व हक्कासाठी काम करते. संघटनेचे संस्थापक आणी अध्यक्ष स्वतः निरजभाऊ आहेत.
पर्यावरण संरक्षण संस्था , यवतमाळ
पर्यावरण संरक्षण संस्था , यवतमाळ ही संस्था पर्यावरण सरंक्षण तसेच जैवविविधता वाढावी यासाठी काम कारते.जसे कि पर्यावरणाचा होणार ऱ्हास कमी करणे, वृक्ष लागवड व संगोपन करणे, पर्यावरणाचे महत्व लोकांना समजून सांगणे आणी लोकांच्यात जनजागृती करणे यासारखी खूप महत्वाची कामे संस्थेच्या मार्फातकेली जात आहेत.
